राम राज्याचे दाखले देणाराचा, रावणाला लाजवेल असा प्रताप

VASTAVCHAKRA NEWS

PIMPRI- राम राज्याचे दाखले देणाराचा, रावणाला लाजवेल असा प्रताप
सुशांत सिंग राजपूत यावर आरडा ओरडा करणारे तुच्छ पत्रकार आज मनीषा ताई वाल्मिकी वर गप्प का ?
उत्तर प्रदेश हाथरस मध्ये घडलेले अनर्थ व त्यात पोलिसांनी व तेथील सरकारने केलेल्या बेजबाबदार कारवाई मुळे आज पूर्ण देशात संतप्त ज्वाला वाढू लागल्या असून उत्तर प्रदेश मधली निर्लज्ज सरकार अजूनही आपल्या खुर्चीशी असे चिटकून बसलेले आहे जाणू काय फेविकॉल ने चिपकुण ठेवलेले आहे.
एकीकडे मनीषा ताई वाल्मिकीनां न्याय मिळावा म्हणून संविधानिक मार्गाने कोरोनाच्या परिस्थिती मध्ये संचारबंदीचे पालन करीत डिस्टन्स मेन्टेन करीत दिवसात 10/10 संघटना निषेध मोर्चे काढीत आहेत हेच दृश्य राज्य राज्य करून देशभर दिसत असताना सुद्धा केंद्र सरकारला जनतेचा राग/रोज व मनीषा ताई वाल्मिकि यांच्यासाठी तळमळ काशी वाटत नाही हाच प्रश्न पडतो.
केंद्र सरकारने उत्तर प्रदेशमध्ये राष्ट्रपती शासन लागवट करतच उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री व मध्यरात्री अंतिम संस्कार करणारे पोलीस अधिकारी यांची चौकशी करावी. स्व. मनीषा ताई वाल्मिकी यांच्या मारेकरी यांना लवकरात लवकर फाशी व्हावी म्हणून हे प्रकरण व स्व. असिफा, निर्भया, डॉ. प्रियांका रेड्डी यांच्या सारख्या प्रत्येक माता बहिणीना व समाजाला न्याय मिळावे म्हणून यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट नेमावे व बलात्कार करणाऱ्यांना फाशी व्हावी म्हणून फाशीचा कायदा बनवावा जानेकरून देशात बलात्कारा सारखे घाणेरडे कृत्याला आला बसेल व माता भगिनींना सुरक्षतेचि हमी मिळेल व भारतीय पत्रकारिते मध्ये एक पक्षाची भूमिका घेणाऱ्या नीच लालची लोभी आढळून आल्यास त्या पत्रकारासहित संस्थापकांना सुद्धा शिक्षा होईल असा कायदा आणावा. ज्याप्रकारे कंगना राणावतला केंद्र सरकारने सुरक्षा दिलेली आहे तशीच सुरक्षा स्व. मनीषा ताई वाल्मिकी यांच्या परिवाराला सुद्धा द्यावी.

अनवर सय्यद – सचिव महाराष्ट्र अल्पपसंख्यक विभाग